#सफर_ तळकोकणच्या_इतिहासाची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार समजले जाणारे खारेपाटण, आजच्या मुंबई - गोवा महामार्गालगत वसलेले एक शांत व रम्य खेडे. परंतु, एके काळी हेच गाव व्यापारी जहाजांच्या येण्या-जाण्याने गजबजलेले असायचे ! कोकणात पुर्वापार व्यापार व वाहतूकीसाठी इथल्या नद्यांचा वापर होत आला आहे. सहाजिकच, या नद्यांच्या किनार्याने व त्यांच्या मुखाशी अनेक महत्त्वाची खेडी, बंदरे व व्यापारी केंद्रे उदयास आली. ‘खारेपाटण’ या गावची कथा सुद्धा अशीच काहीशी! वाघोटन नदीच्या किनार्यावर हे गाव वसलेले आहे. हिंदू, मुसलमान, जैन व ज्यू लोकांची सुद्धा येथे वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. खारेपाटण याचे मूळ प्राचीन नाव 'बळीपट्टण'. दक्षिण व उत्तर कोकणच्या शिलाहारांच्या लेखातही या नावे खारेपाटणचा उल्लेख सापडतो. शिलाहारांच्या दक्षिण कोकण शाखेतील 'धम्मियार' या राजाने येथे दुर्ग व शहर वसवल्याची नोंद त्याच वंशातील 'रट्टराज' याच्या शिलालेखात आढळते. त्या काळापसूनच, खारेपाटण हे एक व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पुढे, सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीज प्रव...
बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा... साल्हेरचे रण आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...