Skip to main content

सर्वसमावेशक राजा

     
 


         आज ललिता पंचमी .......तसे बघायला गेले तर अतिशय सामान्य दिवस. 
इतर ३६५ तिथींसारखी एक तिथी. परंतु इतिहासात या दिवशी एक अतिशय महत्वाची घटना घडली होती.
कोणती ????........
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक !!!

          तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाराजांचा   राज्याभिषेक सोहळा तर जून महिन्यात म्हणजे ज्येष्ठ शु. १३ ला संपन्न झाला होता, मग हा कोणता राज्याभिषेक ????

       हा होता शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक. आजच्या या लेखातून आपण महाराजांच्या याच दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी जाणून घेणार आहोत.

      हा सोहोळा ज्या दिवशी पार पडला त्या दिवशी तिथी होती अश्विन शु. ५ म्हणजेच ललिता पंचमी. इंग्रजी तारीख होती २४ सप्टेंबर १६७४.

      शिवकालीन म्हणजे साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी समाजात वेगवेगळे पंथ होते, तसेेच काही समज, काही चालीरीती रूढ होत्या. शिवाजी महाराजांनी कधीही धर्म, जात, पंंथ असा भेदाभेद केला नाही. परंतु  जनमानसात या गोष्टींचा पगडा होता. 
     त्यामुळे काही लोकांच्या मते पहिल्या राज्याभिषेकामध्ये काही तृटी राहिल्या होत्या. काही विधी यथासांग पार पडले नव्हते. याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी त्यांची धारणा होती. 
       या साऱ्या गोष्टींचे निरसन व्हावे, कोणत्याही प्रकारचा पंथीय वाद उदभवू नये, तसेच एखाद्या पंथाच्या भावना दुखावल्या जाऊ नये या कारणास्तव महाराजांनी हा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. 

       हा सोहोळा खूपच साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांना मंत्रोपदेश केला.
       या राज्याभिषेकाविषयी माहिती निश्चलपुरी गोसावी लिखित ' श्री शिवराज्याभिषेक कल्पतरू' या संस्कृत 
ग्रंथातून मिळते. त्याच बरोबर पहिल्या राज्याभिषेकाबद्दल देखील मोलाची माहिती मिळते.

          एकूणच बघता, दोन्ही राज्याभिषेकांचे विधी जसे वेगळे होते तसेच त्यांचे महत्त्व सुद्धा वेगळे होते. पहिल्या राज्याभिषेकामुळे मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले. तर दुसरा राज्याभिषेक सोहोळा महाराजांची सर्वसमावेशक विचारधारा अधोरेखित करणारा ठरला.....

Comments

  1. खूप छान माहिती.... आणि मला हे माहीत नव्हते. नवे ज्ञान दिल्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक...👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  2. महाराजांच्या कालखंडातील महत्त्वाची घटना अधोरेखित केली त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा.... त्यांचे गुण सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  3. अनेकांना या दोन राज्याभिषेकांबद्दल माहिती नाही.
    अशा विषयांवर केलेल्या लिखाणामुळे सामान्य वाचकांच्या ज्ञानात मोलाची भर घातली जाते हे स्तुत्य.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...