Skip to main content

नाते इतिहासाशी.......

      उपयोग !!! कोणतीही गोष्ट करताना आपण त्या गोष्टीचा आपल्याला पुढे काय उपयोग होईल हे बघतो. त्यात काही गैर नाही. शाळेत आपण जे शिकतो त्याचा दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग होत असतो.
     भाषा, विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण वापर करतोच. परंतु या सगळ्यांच्या सोबतीला अजुन एक महत्वाचा विषय आहे. सगळ्यांना परिचित पण तितकाच अपरिचित देखील. त्याबद्दल खूप लोकांना कुतूहल वाटते पण त्या वाटेला फारसे कोणी जात नाही. हा विषय म्हणजे इतिहास.
नमस्कार,
      आजच्या या लेखातून आपण इतिहास हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. 

      इतिहासाबद्दल एक सर्वसामान्य समज आहे की इतिहास म्हणजे तारखा ! शके !! इतिहास म्हणजे युद्ध !! पण खरोखर विचार केला तर,
 इतिहास म्हणजे एखाद्या प्रदेशाची भाषा, तेथील संस्कृती, दैनिक जीवन, लोकांची विचारधारा, नैसर्गिक वैशिष्ट्ये या सगळ्या घटकांचे एक सुंदर मिश्रण असते. 
उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास मराठी भाषा वगळणे शक्य नाही, त्या बरोबरच संतांचे कार्य, या प्रदेशावर झालेली आक्रमणे, शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराज्याची शिकवण, त्या अनुषंगाने लोकांची विचारधारा तसेच सह्याद्री व इतर पर्वत रांगांमुळे मिळालेले नैसर्गीक अभेद्यपण, ई. या साऱ्याचे एकत्र एकजीव रूप म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास.
     
इतिहासातील या सर्व घटकांमुळे एखाद्या प्रदेशाविषयी आपुलकी निर्माण होते. कळत नकळत त्या प्रदेशाबद्दल मनात कुतहल वाटू लागते. स्थानिक कथा, दंतकथा ऐकून हे कुतूहल अधिकच वाढते. ऐतिहासिक घटनांवर आधारित कथा देखील ऐकलेल्या, वाचलेल्या असतात. ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे त्या कथांची पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतात. इतिहासातील व्यक्ती, ठिकाण, घटना याबद्दल या कथा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात........... 
....... आणि कुठेतरी आपण त्याविषयी विचार करू लागतो. काय घडले, कसे घडले, का घडले, खरे काय, खोटे काय ...... असे असंख्य प्रश्न आपल्याभोवती फिरू लागतात !! 
      आणि या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच माझ्या मते..... ध्यास इतिहासाचा नव्याने !!!!


 

              

       
      


            

Comments

  1. Superb 👌👌👍👍 .... keep it up

    ......mau

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. फारच छान विचार मांडला आहे

    ReplyDelete
  4. छान लेख आहे..! तुझ्या पुढच्या लेखन प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  5. Khup sundar lekhan ahe.
    Keep it up 👍🏻👏😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...