Skip to main content

नाते इतिहासाशी.......

      उपयोग !!! कोणतीही गोष्ट करताना आपण त्या गोष्टीचा आपल्याला पुढे काय उपयोग होईल हे बघतो. त्यात काही गैर नाही. शाळेत आपण जे शिकतो त्याचा दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोग होत असतो.
     भाषा, विज्ञान, गणित, भूगोल या विषयांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपण वापर करतोच. परंतु या सगळ्यांच्या सोबतीला अजुन एक महत्वाचा विषय आहे. सगळ्यांना परिचित पण तितकाच अपरिचित देखील. त्याबद्दल खूप लोकांना कुतूहल वाटते पण त्या वाटेला फारसे कोणी जात नाही. हा विषय म्हणजे इतिहास.
नमस्कार,
      आजच्या या लेखातून आपण इतिहास हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. 

      इतिहासाबद्दल एक सर्वसामान्य समज आहे की इतिहास म्हणजे तारखा ! शके !! इतिहास म्हणजे युद्ध !! पण खरोखर विचार केला तर,
 इतिहास म्हणजे एखाद्या प्रदेशाची भाषा, तेथील संस्कृती, दैनिक जीवन, लोकांची विचारधारा, नैसर्गिक वैशिष्ट्ये या सगळ्या घटकांचे एक सुंदर मिश्रण असते. 
उदाहरणार्थ, महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास मराठी भाषा वगळणे शक्य नाही, त्या बरोबरच संतांचे कार्य, या प्रदेशावर झालेली आक्रमणे, शिवाजी महाराजांनी दिलेली स्वराज्याची शिकवण, त्या अनुषंगाने लोकांची विचारधारा तसेच सह्याद्री व इतर पर्वत रांगांमुळे मिळालेले नैसर्गीक अभेद्यपण, ई. या साऱ्याचे एकत्र एकजीव रूप म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास.
     
इतिहासातील या सर्व घटकांमुळे एखाद्या प्रदेशाविषयी आपुलकी निर्माण होते. कळत नकळत त्या प्रदेशाबद्दल मनात कुतहल वाटू लागते. स्थानिक कथा, दंतकथा ऐकून हे कुतूहल अधिकच वाढते. ऐतिहासिक घटनांवर आधारित कथा देखील ऐकलेल्या, वाचलेल्या असतात. ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे त्या कथांची पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतात. इतिहासातील व्यक्ती, ठिकाण, घटना याबद्दल या कथा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात........... 
....... आणि कुठेतरी आपण त्याविषयी विचार करू लागतो. काय घडले, कसे घडले, का घडले, खरे काय, खोटे काय ...... असे असंख्य प्रश्न आपल्याभोवती फिरू लागतात !! 
      आणि या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच माझ्या मते..... ध्यास इतिहासाचा नव्याने !!!!


 

              

       
      


            

Comments

  1. Superb 👌👌👍👍 .... keep it up

    ......mau

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. फारच छान विचार मांडला आहे

    ReplyDelete
  4. छान लेख आहे..! तुझ्या पुढच्या लेखन प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  5. Khup sundar lekhan ahe.
    Keep it up 👍🏻👏😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...