Skip to main content

"स्वराज्याचे सार ते दुर्ग !!!"

      


    "नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत."  

     हे वाक्य म्हणजे महाराष्ट्रातील रयतेचा अभिमान आहे, विश्वास आहे, स्वाभिमान आहे. या वाक्यानेच सामान्य रयतेस बलाढ्य शत्रूशी लढण्याचे बळ दिले, उमेद दिली. हे वाक्य आहे एका युगपुरुषाचे, स्वराज्याचे  पहिले छत्रपती......... छत्रपती शिवाजी महाराजांचे !!

नमस्कार,

    छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांचे नाते  हे या गडांसारखेच अभेद्य आहे. हे गड ज्या सह्याद्रीवर विराजमान आहेत त्याची सह्याद्री - कणा स्वराज्याचा या लेेखातून आपण ओळख करून घेतली होती. आज आपण शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचे नाते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

     सह्याद्रीच्या शिखरांवर कित्येक लहान मोठे गड       आहेत. यातले बरेचसे गड शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेलेल्या शासकांनी बांधलेले. पण महाराजांनी या गडकोटांना एकत्र गुंफले आणि स्वराज्य उभे केले. 

    स्वराज्याच्या मुलुखात अनेक ठिकाणी गड होते पण दुर्लक्षित झालेले. महाराजांनी अशा किल्ल्यांची डागडुजी करून घेतली. जिथे तटबंदी, बुरुज नव्हते तिथे ते  बांधले.  त्याच बरोबर सुरुंग लावून कडे ताशीव आणि अवघड केले. यामुळे प्रत्येक किल्ला बळकट होऊ लागला.
     नवे गडकोट बांधतानाही ही खबरदारी घेतली जाई.  गडाच्या आजूबाजूला एखादा असा डोंगर वा टेकडी असेल जी भविष्यात किल्ल्यास धोकादायक ठरू शकते ती सुरुंग लावून उडवली जाई किंवा तिथे छोटा कोट बांधला जाई. जसे किल्ले रायगड व लिंगाणा.
 गड बांधण्यासाठी जागा निवडतानाही महाराजांची दूरदृष्टी आपल्याला बघायला मिळते. जागा जेवढी मोक्याची तेवढीच त्या जागेस मिळालेली नैसर्गिक दुर्गमताही महत्वाची असायची. उदाहरणार्थ,
 प्रतापगडाच्या दुर्गमतेचा झालेला उपयोग अफझलखानाच्या भेटी समयी बघायला मिळतो.
सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग या जलदुर्गांमुळे स्वराज्याचे आरमार अधिक मजबूत झाले.

       गड - किल्ले हे मुख्यतः सभोवतालच्या मुलुखाची व्यवस्था व सुरक्षेसाठी असायचे. त्यामुळे गडांच्या रचनेमध्ये देखील आपल्याला महाराजांचा गनिमी कावा दिसतो. रायगडावरील महादरवाजा, त्याची रचना, तिथे मुद्दाम बनवलेले पाण्याचे हौद ,ई. हे या गोष्टीची साक्ष देतात. किल्ल्यांच्या रचनेमधील वैशिष्ट्यांमुळे ते बळकट व अभेद्य बनले. याचा फायदा आतील फौजेस होत असे. वेढा पडल्यास, गड लढवता यावा म्हणून नेहमी खूप दिवस पुरेल इतके अन्नधान्य, दारूगोळा सज्ज ठेवलेला असायचा. 
         बाहेरील शत्रूशी लढताना आत फंद फितुरी होऊ नये, तसेच गडावर एकोपा रहावा यासाठीही स्वराज्यात योजना होती. प्रत्येक गडाची व्यवस्था बघायला वेगवेगळ्या जातीची लोकं असायची. गडकरी, सबनीस व कारखानीस हे प्रत्येक किल्ल्यावरचे मुख्य अधिकारी असत. प्रत्येक जण नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण करायचा. नियम मोडणाऱ्यास कडक शासन केले जाई. त्यामुळे गडावर व एकूणच स्वराज्यात शिस्त होती. म्हणून स्वराज्यातील गडकोट काबीज करणे ही सोपी गोष्ट नव्हती. या गोष्टीचा प्रत्यय पुढे घडलेल्या घटनांमध्ये दिसतो. बादशहा औरंगजेबासही स्वराज्याचे गडकोट संपूर्णपणे काबीज करता आले नाहीत. 

       गडकिल्ल्यांच्या आसऱ्याने शिवाजी महाराजांनी साल्हेर अहिवंतापासून कावेरी पर्यंत निष्कंटक राज्य स्थापले. खरोखरच दुर्ग हे स्वराज्याचे व सह्याद्रीचे पोलादी चिलखत आहे. या चिलखतीने सदैव स्वराज्याचे प्राण वाचवले. 
     एखाद्या योध्द्याचे चिलखत जसे सगळ्यांना त्याच्या पराक्रमाची आठवण करून देते तसेच स्वराज्याचे हे चिलखत आपल्याला स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या असंख्य मावळ्यांची आठवण करून देते..... आणि जाणीव करून देते की महाराज का म्हणायचे ....... 
  " संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !!! " .....

   

 
        

    

      


      
   
    


      

Comments

  1. Good going

    ह्या पुढे आता एका एका किल्ल्याचे वैशिष्ठ्य अभ्यासा

    ReplyDelete
  2. खूप छान
    अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  3. अत्यंत नेमके लेखन व स्वराज्यात गडाचं असलेले महत्त्व योग्यप्रकारे अधोरेखित केले आहे.. खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. Khupach sundar .....
    Vakyrachna apratim

    Trekking aathvan khup divsani ali.....thank you

    Keep going👍👍

    From may....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड

सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर जाणाऱ्या गिरीशिखरावर वसलेलं, जावळीच्या निबीड अरण्यातील गोमटे दुर्गशिल्प - किल्ले रसाळगड! रत्नागिरीच्या खेड तालुक्यात महिपत - सुमार - रसाळगड ही दुर्गमालिका वसलेली आहे. त्यापैकी रसाळगड उंचीने सगळ्यात कमी पण दिसायला नेटका - जगबुडी नदीचे खोरे, चहू बाजूंनी घनदाट जंगल आणि दूरवर दिसणारी रमणीय गिरिशिखरे यांच्या कोंदणात रसाळगड वसला आहे.  भरणे नाका (खेड) येथून तळे - बंदरवाडी - निवाचीवाडी - झापडी ( घेरा रसाळगड ) अशा टुमदार वाड्या-वस्त्यांमधून वळणं घेत गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. पायथ्याला गडाची पेठ अर्थात पेठवाडी/रसाळवाडी आहे. इथपर्यंत डांबरी रस्ता असून ठराविक वेळी बस देखील जाते. पण खासगी वाहन असल्यास अधिक उत्तम. गडाची चढण अगदीच सोपी आहे. त्यात बांधीव दगडी पायऱ्यांची वाट असल्याने चढायला फारसे श्रम लागत नाहीत. दगडी वाटेच्या सुरुवातीलाच धोंडेजवळ शिवलिंग आहे. गडाचे पहिले दोन दरवाजे शाबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून दुसऱ्याकडे जाताना वाटेत मारुतीची घुमटी आहे. तिथे लहान आणि मोठी अशा हनुमानाच्या दोन मूर्ती आहेत. मोठी मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असू...

मोरोपंत पिंगळे – एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व

      १८ व्या शतकात मराठेशाहीचा विस्तार भारतभर झाला. यामध्ये पेशव्यांचे योगदान निर्विवादपणे मोठे आहे. किंबहुना 'पेशवे' म्हटल्यावर १८ व्या शतकात होऊन गेलेल्या पेशव्यांचीच सर्वसाधारणपणे आठवण होते. पण मराठेशाहीत पराक्रमी पेशव्यांची परंपरा अगदी पूर्वीपासून अर्थात स्वराज्य उभारणीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेली आहे. १७ व्या शतकात स्वराज्याच्या कार्यातील एक महत्वाचे व प्रमुख नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पेशवे - मोरोपंत पिंगळे. अगदी प्रारंभीच्या काळापासून महाराजांच्या पदरी असलेले व जवळपास १८ वर्षे पेशवेपदावर राहिलेल्या स्वराज्याच्या या शिलेदाराच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न: किल्ले साल्हेर  इ.स.१६५६ साली जावळी हस्तगत झाली आणि सह्याद्रीच्या कुशीतील निबीड अरण्याचा प्रदेश स्वराज्यात सामील झाला. याच घनदाट जंगलात पारघाटाच्या तोंडाशी महाराजांनी भोरप्या डोंगरावर नवीन दुर्ग – प्रतापगड वसवण्याची जबाबदारी मोरोपंतांना दिली. तत्पूर्वी राजगडावरही करावयाच्या काही बांधकामांची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती असे दिसते. पुढे अफजलखानाच्या...

थोरला मनसुबा

  माझे नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊन....  ...... नमियेली सारज्या। ल्याली जडिताचे भूषण.... अज्ञानदासाचे वचन....... होऽ होऽ हो होऽ होऽ.....              डफ, तुणतुणे आणि झांजांच्या तालावर ' अफजलखान वधा'  चे रसभरीत व अंगावर शहारे आणणारे वर्णन आपण पोवाड्यातूून कधी न कधी ऐकले आहे. त्या भेटीचा थरार अनुभवला आहे.      ही घटना  विकारी नाम संवत्सर   शके १५८१ मध्ये आजच्या दिवशी म्हणजेच  मार्गशीर्ष शु. ७ या तिथीला घडली. त्या दिवशी इंग्रजी तारीख होती १० नव्हेंबर १६५९.        आजच्या या तिथीच्या औचित्यावर बघूयात  अफजलखान वध या घटनेेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून.....      अफजलखान कोण आणि कसा होता, हे आपण जाणतोच. त्याला त्याच्या पराक्रमावर अतिशय गर्व होता, तसेच स्वतःच्या सामर्थ्याची भयंकर घमेंड होती. खानाच्या या गर्विष्ठ, घमेंडखोर स्वभावाचा उपयोग करूनच महाराजांनी त्याचा वध केला.          परंतु खान मेला म्हणजे मोहीम संपली असे नव्हते.  खान वधाच्या दुसऱ्य...