Skip to main content

"स्वराज्याचे सार ते दुर्ग !!!"

      


    "नवे जुने तीनशे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनशे साठ वर्षे पाहिजेत."  

     हे वाक्य म्हणजे महाराष्ट्रातील रयतेचा अभिमान आहे, विश्वास आहे, स्वाभिमान आहे. या वाक्यानेच सामान्य रयतेस बलाढ्य शत्रूशी लढण्याचे बळ दिले, उमेद दिली. हे वाक्य आहे एका युगपुरुषाचे, स्वराज्याचे  पहिले छत्रपती......... छत्रपती शिवाजी महाराजांचे !!

नमस्कार,

    छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांचे नाते  हे या गडांसारखेच अभेद्य आहे. हे गड ज्या सह्याद्रीवर विराजमान आहेत त्याची सह्याद्री - कणा स्वराज्याचा या लेेखातून आपण ओळख करून घेतली होती. आज आपण शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचे नाते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

     सह्याद्रीच्या शिखरांवर कित्येक लहान मोठे गड       आहेत. यातले बरेचसे गड शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेलेल्या शासकांनी बांधलेले. पण महाराजांनी या गडकोटांना एकत्र गुंफले आणि स्वराज्य उभे केले. 

    स्वराज्याच्या मुलुखात अनेक ठिकाणी गड होते पण दुर्लक्षित झालेले. महाराजांनी अशा किल्ल्यांची डागडुजी करून घेतली. जिथे तटबंदी, बुरुज नव्हते तिथे ते  बांधले.  त्याच बरोबर सुरुंग लावून कडे ताशीव आणि अवघड केले. यामुळे प्रत्येक किल्ला बळकट होऊ लागला.
     नवे गडकोट बांधतानाही ही खबरदारी घेतली जाई.  गडाच्या आजूबाजूला एखादा असा डोंगर वा टेकडी असेल जी भविष्यात किल्ल्यास धोकादायक ठरू शकते ती सुरुंग लावून उडवली जाई किंवा तिथे छोटा कोट बांधला जाई. जसे किल्ले रायगड व लिंगाणा.
 गड बांधण्यासाठी जागा निवडतानाही महाराजांची दूरदृष्टी आपल्याला बघायला मिळते. जागा जेवढी मोक्याची तेवढीच त्या जागेस मिळालेली नैसर्गिक दुर्गमताही महत्वाची असायची. उदाहरणार्थ,
 प्रतापगडाच्या दुर्गमतेचा झालेला उपयोग अफझलखानाच्या भेटी समयी बघायला मिळतो.
सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग या जलदुर्गांमुळे स्वराज्याचे आरमार अधिक मजबूत झाले.

       गड - किल्ले हे मुख्यतः सभोवतालच्या मुलुखाची व्यवस्था व सुरक्षेसाठी असायचे. त्यामुळे गडांच्या रचनेमध्ये देखील आपल्याला महाराजांचा गनिमी कावा दिसतो. रायगडावरील महादरवाजा, त्याची रचना, तिथे मुद्दाम बनवलेले पाण्याचे हौद ,ई. हे या गोष्टीची साक्ष देतात. किल्ल्यांच्या रचनेमधील वैशिष्ट्यांमुळे ते बळकट व अभेद्य बनले. याचा फायदा आतील फौजेस होत असे. वेढा पडल्यास, गड लढवता यावा म्हणून नेहमी खूप दिवस पुरेल इतके अन्नधान्य, दारूगोळा सज्ज ठेवलेला असायचा. 
         बाहेरील शत्रूशी लढताना आत फंद फितुरी होऊ नये, तसेच गडावर एकोपा रहावा यासाठीही स्वराज्यात योजना होती. प्रत्येक गडाची व्यवस्था बघायला वेगवेगळ्या जातीची लोकं असायची. गडकरी, सबनीस व कारखानीस हे प्रत्येक किल्ल्यावरचे मुख्य अधिकारी असत. प्रत्येक जण नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण करायचा. नियम मोडणाऱ्यास कडक शासन केले जाई. त्यामुळे गडावर व एकूणच स्वराज्यात शिस्त होती. म्हणून स्वराज्यातील गडकोट काबीज करणे ही सोपी गोष्ट नव्हती. या गोष्टीचा प्रत्यय पुढे घडलेल्या घटनांमध्ये दिसतो. बादशहा औरंगजेबासही स्वराज्याचे गडकोट संपूर्णपणे काबीज करता आले नाहीत. 

       गडकिल्ल्यांच्या आसऱ्याने शिवाजी महाराजांनी साल्हेर अहिवंतापासून कावेरी पर्यंत निष्कंटक राज्य स्थापले. खरोखरच दुर्ग हे स्वराज्याचे व सह्याद्रीचे पोलादी चिलखत आहे. या चिलखतीने सदैव स्वराज्याचे प्राण वाचवले. 
     एखाद्या योध्द्याचे चिलखत जसे सगळ्यांना त्याच्या पराक्रमाची आठवण करून देते तसेच स्वराज्याचे हे चिलखत आपल्याला स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या त्या असंख्य मावळ्यांची आठवण करून देते..... आणि जाणीव करून देते की महाराज का म्हणायचे ....... 
  " संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !!! " .....

   

 
        

    

      


      
   
    


      

Comments

  1. Good going

    ह्या पुढे आता एका एका किल्ल्याचे वैशिष्ठ्य अभ्यासा

    ReplyDelete
  2. खूप छान
    अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  3. अत्यंत नेमके लेखन व स्वराज्यात गडाचं असलेले महत्त्व योग्यप्रकारे अधोरेखित केले आहे.. खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. Khupach sundar .....
    Vakyrachna apratim

    Trekking aathvan khup divsani ali.....thank you

    Keep going👍👍

    From may....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

युद्धभूमी साल्हेर - मराठ्यांची यशोगाथा

  बागलाण ! नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदूरबार, गुजरातमधील डांग यापासून बनलेला ‘बागलाण’ म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील समृद्ध भूप्रदेश. चांगले हवामान, सुपीक जमीन याने संपन्न असलेल्या या डोंगराळ मुलुखातील एक अनमोल रत्न म्हणजे दुर्ग साल्हेर ! कळसूबाई नंतर दुसर्‍या क्रमांकाचे गिरीशिखर आणि महाराष्ट्रातील सर्वांत उंच गड म्हणून साल्हेर विख्यात आहे. शिवकाळात अर्थात इ.स. १६७० नंतर मराठ्यांनी मुघलांविरुद्ध ज्या तुफान घोडदौडेची सुरुवात केली, त्यामध्ये साल्हेर हा बागलाण प्रदेशात मराठ्यांचे एक प्रमुख केंद्र बनला. याच युद्धभूमी साल्हेरशी निगडीत मराठ्यांची ही यशोगाथा...   साल्हेरचे रण  आग्र्याहून परतल्यानंतर स्वराज्याची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी शिवाजी राजांनी पुरंदरचा तह पुन्हा कायम करून घेतला. परंतु, इ.स. १६६९ च्या अखेरीस औरंगजेबाने हा तह स्वतःच मोडला व महाराजांना आग्र्याला येण्यासाठी दिलेला वाटखर्च संभाजी राजांच्या जहागिरीमधून कापून घेतला. एवढेच नव्हे तर औरंगाबादेस मुक्कामी असणार्‍या राजांच्या लोकांना अटक करण्याची आज्ञा त्याने शाहजादा मुअज्जमल...

थोरले राऊस्वामी 🚩 ३२५ वी जयंती

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे - थोरल्या महाराजांचे स्वप्न घेऊन व शाहूछत्रपतींचा विश्वास सार्थ करून दिल्लीपावेतो धडक मारणारे मराठ्यांच्या इतिहासातील पराक्रमाचे एक झंझावाती सुवर्ण पर्व ! ✨️🚩 अवघ्या चाळीस वर्षाच्या हयातीत आणि वीस वर्षाच्या पेशवेपदाच्या कारकीर्दीत रावसाहेबांची एक एक मोहीम थक्क व्हायला लावते. मग ती मराठ्यांच्या लष्करी परंपरेतील एक मानबिंदू ठरावा अशी पालखेडची मोहीम असो; वा पातशाहास त्याच्या सरदारांनी वाढवून चढवून सांगितलेल्या स्वपराक्रमाच्या कथा पातशाहास 'सत्य वाटल्या, त्या मिथ्या कराव्या' म्हणून थेट दिल्लीवर मारलेली धडक असो.  हरएक मोहिम म्हणजे स्वतंत्र अभ्यासाचा विषय! अगदी भट पेशवे घराण्याच्या हकिकतीमधील दिल्ली स्वारीचा हा ओझरता उल्लेख बघा, "...स्वता श्रीमंत कैलासवासी पंत प्रधान बाजीराव साहेब दिलीस गेले. हिंदुस्थान वगैरा येथील राज रजवाडे पुंड पालेगार याची पारपत्ये केली व खंडण्या घेतल्या व मुळूक सोडविला..." (मराठी दफ्तर रुमाल २, लेखांक ३) आपला जीवाभावाचा साथीदार युद्धात कामी आला म्हणून "मीच तुमचा बाजी" म्हणत कधी कुणाचे सांत्वन करावे, त...

राजापूरची इतिहास प्रसिद्ध इंग्रज वखार

#सफर_ऐतिहासिक_तळकोकणाची “साहुकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा... (मात्र) सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपिकर हेही लोक सावकरी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करितात. त्यांचे हुकुमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती सावकारीस येतात. राज्य करणारांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? तथापि, टोपिकरांचा या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान....” आज्ञापत्रातील ही वाक्ये म्हणजे जणू युरोपीय आक्रमकांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाबद्दलचा व त्यांच्या अंतस्थ हेतूंचा शिवरायांनी दिलेला संकेत. या युरोपीय ‘व्यापारी’ लोकांबद्दल शिवाजी महराजांनी नेहमीच सावधता बाळगलेली दिसते. व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान, युद्धसामग्री यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा अनेकांशी मराठ्यांचे संबंध असले तरी जरा कुठे शिरजोरी केल्यास महाराजांनी त्यांना वेळोवेळी ताळ्यावरही आणले. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजापूरचे इंग्रज! अर्जुना नदीच्या काठावर वसलेले राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातले एक प्रमुख...